Sunday, May 1, 2011

Sant Eknath maharaj संत एकनाथ महाराज



संत एकनाथ महाराज एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले. शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :

१- नाथ किती महान होते ते कळत

२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते

३ - माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत

४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका

५ - रागावून त्रास तुम्हालाच

६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच

७ - दुसरयाला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.


शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकीनुसारच दिली पण, नाथांची गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस,

“कि हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे “. शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?”. तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसच होत या कृती मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही नाथ संत असले तर तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत न कि, नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण.

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !!

जय हिंद, जय महाराष्ट्र

!!! II मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र-धर्म वाढवावा II

No comments:

Post a Comment