Thursday, December 15, 2011

Innocent Kids Marathi short reading लहान मुले

लहान मुले किती निरागस असतात त्याचा एक अनुभव :

४ वर्षाचा मुलगा (जय).. एकदा सुट्टी मध्ये तो त्याच्या आजी आजोबांकडे राहायला गेला होता. 

त्या दिवशी शिवजयंती होती.. ठीक ठिकाणी मंडप बांधून शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केले होते... महाराजांचे
 पोवाडे सुरु होते... चांगली वातावरण निर्मिती झाली असल्यामुळे

माझ्या आई ने जय ला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या..
 (तेवढाच त्याच्या मस्तीखोर स्वभावाला control करण्याचा प्रयत्न ..:) जय ने सुद्धा मन लावून गोष्टी ऐकल्या. मग प्रश्न-उत्तर सेशन सुरु झाले..

जय : आजी शिवाजी महाराज खूप चांगले होते ना?

आजी : होय जय.. खूप चांगले होते.

जय : आज त्यांचा 'Happy Birthday' ना?

आजी : होय .

जय : आता ते कुठे आहेत?

आजी : स्वर्गात देव बाप्पा कडे गेले.

जय : ते देव बाप्पा कडे का गेले?

आजी : (थोडा अवघड प्रश्न.. पण आज काल ची मुले खूप हुशार असतात असा विचार करून..) अरे, खूप मोठे झाले ना कि माणूस मरण पावतो आणि मग देव बाप्पा त्याला स्वर्गात आपल्या कडे बोलावून घेतो.

जय : ( थोडा वेळ विचार करून) आजी तू पण खूप मोठी आहेस ना.. मग तू पण आता काही दिवसांनी मरशील... ?
आजी : (काय बोलावे हे न कळून ) ..............................

जय : मेल्यावर तू खूप खुश होशील नाही?

आजी : (प्रश्नार्थी चेहरा) खुश का बरे????

जय : अग, मेल्यावर तू पण स्वर्गात जशील ना आणि तिथ तुला शिवाजी महाराज भेटतील.. मग त्यांना भेटून तू खूप खुश होशील ना......

या उत्तरानंतर आजीला कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करता आली नाही हे सांगायला नको.

No comments:

Post a Comment